सोमवार, २४ जानेवारी, २०११

सुविचार


* आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.

* जग प्रेमाने जिंकता येतं; शत्रुत्वाने नाही.

* ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.

* यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास.

* मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं.

* प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस !

* अपयशाने खचू नका; अधिक जिद्दी व्हा.

* आपल्यामुळे दुसऱ्याला दु:ख होईल असे कधीही वागू नका.

* निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही.

* खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते.

* सत्याने मिळतं तेच टिकतं.

* जो दुसऱ्यांना देतो त्याला देव देतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा