शनिवार, ११ जून, २०११

'पाऊस'

पाऊस आलाय….भिजून घ्या
थोडा मातीचा गंध घ्या
थोडा मोराचा छंद घ्या
उरात भरून आनंद घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या
बघा समुद्र उसळतोय
वारा ढगांना घुसळतोय
तुम्हीही त्यांच्यात मिसळून घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या
ऑफ़ीस रोजच गाठत असतं
काम नेहमीच साठत असतं
मनातून भिजावंसं वाटत असतं
मनाची हौस पुरवून घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या
सर्दी पडसे रोजचेच..
त्याला औषध तेच तेच..
प्यायचेच आहेत नंतर काढे ,
आधी अमृत पिऊन घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या
बघा निसर्ग बहरलाय
गारव्याने देहही शहारलाय
मनही थोडं मोहरून घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या

मनांत नसतांना............

मनांत नसतांना............

मनात नसतांना........


मनात नसतांना कुणाला तरी
कधी कधी दुखवावे लागते
उत्तर माहीत नसलेल्या प्रश्नांना
मनात कधीतरी सामोरे जावे लागते.....
मनात नसतांना कुणाला तरी
कधी कधी फसवावे लागते...
दिशा माहीत नसलेल्या वाटसरुला
मिळेल त्या वाटेने जावे लागते!!
हरीत फांदीच्या मनात नसतांना
फुलाला डहाळीवरुन पडावे लागते!!
आणि माणसांच्या मनात नसतांना
कधीतरी जगातुन जावे लागते!!
मनात नसतांना कधीतरी,कोणाच्या तरी
प्रेमात पडावे लागते...आणि.....




प्रेमभंग झाल्यास त्या प्रेमाची आठवण
घेत आयुष्य घालावं लागते!!!


मनांत नसतांना............

माफ करशील का मला

माफ करशील का मला

माफ करशील का मला
मला माहिती आहे
चुक माझीच होती
माझ्यातच ती हिंमत नव्हती
प्रेम केल पण ते निभाऊ नाही शकले
या जगाचा सामना नाही करू शकले
असही नव्हत माझा तुझ्यावर विश्वास नव्हता
पण कदाचित कदाचित मी
स्वतावरच विश्वास नाही ठेऊ शकले
तुला कितीतरी प्रश्न पडले असतील न
मी दिलेली वचने त्या
घेतलेल्या आणाभाका
ती मी दाखवलेली स्वप्ने
सारी खोटी होती की काय
रोजच्या प्रमाणे भेटायला आले खरी
पण हे सांगायला की
तुझी आणि माझी शेवटची भेट
आता तुझी वाट वेगळी
आणि माझी वाट वेगळी
मग इतके दिवस प्रेम केलास
ते फक्त नाटकच होत की काय
तू कधी माझी मजबुरी
समजुन घेशील का रे
तू कधीतरी मला माफ
करू शकशील का रे

मी फ़क्त तुझीच.....!!

मी फ़क्त तुझीच.....!!

मी फ़क्त तुझीच.....!!
तुझ्यावर जेवढ प्रेम केल
तेवढ कोणावरच नाही
पुन्हा कोणावर एवढ प्रेम करेन,
अस आता वाटत नाही...
...
माझ्या आयुष्यात जे तुला स्थान दिल
ते स्थान कोणी कधी मिळवलच नाही
पुन्हा ते स्थान कोणाला मिळेल,
अस आता वाटत नाही...

तुझ्याशी जे नात जोड़ल
ते नात कधी कोणाशी जोडलच नाही
पुन्हा कधी ते जोड़ेन कोणाशी,
अस आता वाटत नाही...

तुला जेवढ सामावून घेतल मी डोळ्यात
तेवढ मी कोणाला पाहिल देखिल नाही
पुन्हा कोण हया डोळ्यात दिसेल,
अस आता वाटत नाही...

जी रह्स्याची दारे तुझ्या समोर उघडली
ती दारे कधी कोणासमोर उघडलीच नाही
पुन्हा ती दारे कधी उघडतील,
अस आता वाटत नाही...

कारण माझ जीवनच एक रहस्य बनलय
ते फ़क्त तुलाच उमगलेल कोड बनुन राहिलय
ते कोड आता माझ्यानेही कधी सुटेल,
अस आता वाटत नाही...

तू माझा राहिला आहेस
अस आता वाटत नाही...
पण तरीही मी फ़क्त तुझीच सुख-राणी आहे
अन कोणा राजाची मी राणी होईन,
अस आता वाटत नाही...

शुक्रवार, १० जून, २०११

आपले आई - वडील वृद्ध होतात .....!"


मनामनातील सुंदर नाती अनेक मने, अनेक जाती निवडण्या

मनामनातील सुंदर नाती अनेक मने, अनेक जाती निवडण्या

 

मनामनातील सुंदर नाती
अनेक मने, अनेक जाती
निवडण्याचे आपुल्या हाती
बोल प्रेमाचे बनवती नाती

कांही नाती ती प्रेमापुरती
असती कांही स्वार्थापुरती
फिरती कांही वासनेभोवती
असती खरी मायेची नाती

म्हणे असती रक्ताची नाती
प्रेम ओलावा त्यात मिळती
पैशासाठी नात्यास मारती
अशी कशी ही रक्ताची नाती?

प्रेम, माया निर्माण करती
मदत जे दुसऱ्यास करती
निस्वार्थपणे नाती जगती
खरे नाते त्यास म्हणती

माझी एक इच्छा आहे...

माझी एक इच्छा आहे...



माझी एक इच्छा आहे...

माझी अंतयात्रा मला पहायची आहे...

पहायचंय मला, कोण रडतंय माझ्या मरणावर?,

अन् पहायचंय कोण हसतंय माझ्या सरणावर?...

पहायचंय मला कोण म्हणतय; "अरेरे गेली...!",

अन् पहायचंय मला कोण म्हणतय; "बरं झालं मेली...!"

आणि हो...

अजुन एक इच्छा ऐका माझी,

मला जाळण्यापूर्वी वाट पहा 'त्याची'...

येईल 'तो' जरुर हे मात्र नक्की आहे,

नाहीच आला तर, स्वर्गात भेट आमची पक्की आहे...

माझ्या तिरडीवर लावू नका फुल-तुरे,

त्याच्या डोळ्यातून निघालेले दोन अश्रुच पुरे....!

माझ्या मृत्युवर नका करू कळवळT,

त्याची सारी प्रेमपत्रे फ़क्त अग्निमध्ये जाळT...

मला अग्नि देता क्षणी तो सुद्धा रडणार आहे,

कारण माझ्यासोबत त्याचे ह्रदय सुद्धा जळणार आहे...

मी मेल्यावरच आमचे प्रेम जगाला कळणार आहे,

कारण तो एक दिवस तरी माझ्यासाठी वैधव्य पत्कारणार आहे...!!

**अग्नीला कोण पुन्हा, नव्यानं अग्नी देत आहे*** .

**अग्नीला कोण पुन्हा, नव्यानं अग्नी देत आहे*** .

**अग्नीला कोण पुन्हा, नव्यानं अग्नी देत आहे***
.
मला सजवण्या मागे, तुमचा काय बेत आहे
माझ्या शरीराचा कोणता, अर्थ अभिप्रेत आहे


फुल होऊन आतास, कुठे मी फुलू पाहतो
कोण चार खांद्यावरुन, मला असं नेत आहे


कधी ज्यांच्यासाठी मी, त्यांचं दूनिया होतो
मला एकटं सोडताना, ते कोणत्या दुनियेत आहे


आजवर प्रत्येकाला, मी आधारच देत आलो
मग माझा भार का, असा लाकडावर येत आहे


ज्यांच्या पोटापाण्यासाठी, मी वणवण फिरलो
माझ्या भोवती फिरून, का तोंडात पाणी टाकत आहे


तेवलो मी त्यांच्यासाठी, प्रकाश मिळावा म्हणून
अग्नीला कोण पुन्हा, नव्यानं अग्नी देत आहे


मला नाही पटलं माझ्याच आप्तेष्टांचं वागणं
सरणावरून उठलो, तर म्हणे भूतप्रेत आहे


मातीचा लगाव मला, शेवटी मातीतच मिसळलो
थोडाफार जे उरलो, ती राख गंगेत आहे


आठवण माझी येताच, नजर फिरवा आभाळभर
असंख्य रुपात लुकलुकत, मी त्याच्या कवेत आहे


समजू नका मी गेलो, आहे अजून तुमच्यातच
मरणावरच्या प्रत्येक कवितेत, जिवंत भूमिकेत आहे


प्रत्येक जबाबदारी मी, यशस्वी रित्या पार पाडली
माझी जबाबदारी त्यांच्यावर, मी कोणत्या भूमिकेत आहे


जन्मापासून कोणी पुढे, तर कोणी मागे आहे उभं
आज मी एकटाच, मी नक्की कोणत्या रांगेत आहे

हे असा मुलींच्या बाबतीतच का ?

एक छोटीशी कळी मायेच्या कुशीत उमलली 
आईनं परि म्हटलं तिला अन बाबांची झाली ती लाडली

या चिमुकलीच्या येण्यानं सारं घर गजबजून गेलं
कालपर्यंत उंच भासणारं आभाळही आज जणू ठेंगणं वाटू लागलं
हळूहळू चिमणी आता रांगायला लागली
घराची मोठी जागाही आता कमी वाटायला लागली

दिवसभर दंगा करून सारं घर डोक्यावर घायची
स्वतः शांत झोपायची आई बाबांना रात्ररात्र जागवायची
डगमगत का होईना ती चालायला लागली
पण तोल जावून ती पडली तेव्हा जखम आईच्या काळजाला झाली विचारत

आता लाडली हळूहळू बोलायला लागली
ती आधी आई म्हणेन कि बाबा घरात याचीच शर्यत लागली

पण परंपरेनुसार तिनही "आईच" शब्द उच्चारला
बाबा शर्यत हरले पण त्यांनी सहज हसूनच आपला मोठेपणा दाखवला

आता चिमणीच नाव एका शाळेमध्ये घातलं
"आई -बाबा" नाव पाटीवर गिरवण सुरु झालं
येथून पुढे बरेच क्षण आनंदाचे आले
चिमणी मोठी झाली पण तिचे बालपण डोळ्यातच राहिले

सतत जबाबदारीचे ओझे असल्याने बाबांना कधी निवांतपणे बोलणे जमलेच नाही
सकाळी बाबा कामासाठी लवकर निघून जायचे अन घरी आल्यावर
एकच प्रश्न असायचा ......" झोपली का गं ताई ?? "

वेळ कधी थांबत नाही हा तर आहे सृष्टीचाच नियम
लग्न होवून लाडली सासरी निघून जाणार.......
याचीच चिंता वाटायची आई बाबांना कायम

खूप प्रेम लावून आईबाबांनी या कळीचा गुलाब केला
एक राजकुमार येवून तो गुलाब घेवून गेला

आता हि आनंदान भरलेली बाग क्षणभरात रिकामी झाली
लेक सासरी जात असताना आईबाबांच्या डोळ्यांत अश्रूंची धार लागली

आता येथे सारं काही आहे फक्त चिमणीच तेवढी नाही
कधी माहेरी परतणार माझी लाडली सारखी विचारत असते तुझी "आई ".........

संसार

संसार

दोन पाखरांचा संसार होता...
वास्तवात नाही पण तिच्या स्वप्नात होता..

१४ फेब्रुवारी ला लग्न...
आणि व्हायचा विचार होता..

लग्नानंतर रोज एक चोकलेट..
आणि रोज बाहेर फिरायला जायचं असा तिचा हटट होता..

आपले चौघांचे कुटुंब असेल..
मोठी कृपा तर छोटा पार्थ असेल...

दर १ नोव्हेंबर ला कैंडललाइट डिनर..
तिथे आपल्या दोघं शिवाय आणखी कुणी नसेल..

आपल्या दोघांच छोटस घर असेल..
गुलाबी भिंती आणि मार्बल फ्लोर असेल..

कृपा ला डॉक्टर आणि पार्थ ला स्पोर्टसमन बनवायचे...
आणि आपण आपल्या जबाबदारीतुन मुक्त व्हायचे....

आमच्या ह्या संसाराला कुणाची तरी नज़र लागली...
आमच्या स्वप्नाची नाव नशिबाच्या सागरात बूडू लागली..

त्या बुडणाऱ्या नावेकडे बघन्यावाचून कोणताच पर्याय नव्हता...
घात करणाऱ्या त्या लाटा थाम्बायाचे नाव घेत नव्हत्या...

शेवटी स्वप्नांची ती नाव बूडून गेली...
पाखरांच्या स्वप्नाना तडा देऊन गेली..

स्वप्न तुटल्याने ती दोन पाखरे तडफडत होती...
आता कधी जिव निघून जातो ह्याकडे नज़र लागली होती.

" हो ..... मलाही ! "

तिला ठाऊक होतं ...त्याचं आपल्यावर अतोनात प्रेम आहे
तिचंही होतंच, कदाचित त्याच्यापेक्षा जास्तच !
दोघंही प्रेम करत होते एकमेकांवर जीवापाड ...
दोघांना ही होती मनापासून याची जाणीव ...
त्यालाही काही विचारायचं होतं ,
तिलाही काहीतरी बोलायचं होतं ,
पण ... दोघांनी सारं मनातच ठेवलं होतं !
शेवटी तिला सुचली एक कल्पना ...
नेहमीप्रमाणे भेटले दोघे एकदा एकांतात ...
ती लाडात येऊन म्हणाली ,
काल मला एक स्वप्नं पडलं ...
स्वप्नात कोणीतरी मला propose केलं ...
" will you marry me ? "
त्याने न राहवून विचारलं, मग उत्तर काय दिलंस ?
ती म्हणाली " हो शिवाय दुसरं काही सुचलंच नाही "
त्याने उत्सुकतेने विचारलं " कोण होता ? सांगशील का ? "
ती लाजून म्हणाली " वेड्या ! तूच , आणखी कोण ? "
तो खूश झाला, तिचा चेहरा आपल्या हातात धरून म्हणाला
" खरंच ? माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं "
ती गालातल्या गालात हसली ... आणि म्हणाली
" हो ..... मलाही ! "

एका गावात एक मुलगी राहात असते. तिला चार मित्र असतात.

एका गावात एक मुलगी राहात असते. तिला चार मित्र असतात.

त्यापैकी चौथ्या मित्रावर ती जिवापाड प्रेम करत असते. त्याला ती नेहमी मोठमोठ्या भेटवस्तू देत असते. जगातली सर्वांत महत्त्वाची गोष्ट त्याला मिळायला हवी, असा तिचा कटाक्ष असे.

त्या खालोखाल तिसऱ्या मित्रावरही ती प्रेम करत असते. त्याला ती नेहमी शेजारची राज्ये दाखवत असते; मात्र, ते बघून तो आपल्याला कधीतरी सोडून जाईल अशी भीती तिच्या मनात नेहमीच असते.

दुसऱ्या मित्रावरही ती प्रेम करत असते....तिचा दुसरा मित्र अतिशय निष्ठावान असतो. तिची संपत्ती, तिची मालमत्ता राखण्यात त्याचा मोठा सहभाग असतो.

तिचा पहिला मित्र ...त्याचा आत्मविश्‍वास वाखाणण्यासारखा असतो. मनाने तो खूप प्रेमळ, दयाळू आणि संयमी असतो. तो तिला नेहमी समजून घेत असतो. ती जेव्हा कधी संकटात सापडते, काही समस्या तिला भेडसावतात; तेव्हा तेव्हा ती आपले मन त्याच्याकडे मोकळे करते. तोही तिला समजून घेतो, त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सांगतो.

तरीही, तिला तो फारसा आवडत नसतो. तो मात्र तिच्यावर खूप मनापासून प्रेम करत असतो. ती क्वचितच त्याची दखल घेत असते.


एक दिवस ती मुलगी आजारी पडते. उपचारांचाही काही परिणाम होत नाही. आपल्याकडे खूप कमी वेळ आहे, हे तिच्या लक्षात येते. तिच्या मनात विचार येतो, ""माझ्याकडे भरपूर संपत्ती आहे. माझे जिवाभावाचे चार मित्र आहेत; पण जेव्हा माझा मृत्यू होईल, तेव्हा मी एकटीच असेन.'' या विचारांनी ती अस्वस्थ होते.

ती आपल्या सर्वांत आवडत्या चौथ्या मित्राला म्हणते, ""मी तुझ्यावर सर्वाधिक प्रेम केले. जगातल्या सर्वांत मौल्यवान भेटी मी तुला सतत दिल्या. तुझी खूप काळजी घेतली. आता माझा अंतकाळ जवळ आला आहे. तू माझ्याबरोबर येशील ना? माझी साथ करशील ना?''

""अजिबात नाही,'' असे म्हणून आणखी काहीही न बोलता तो मित्र निघून जातो.

त्याचे हे बोलणे तिचे काळीज चिरत जाते.

त्यानंतर ती मुलगी तिसऱ्या मित्राकडे येते. ""आयुष्यभर मी तुझ्यावर प्रेम केले. आता मी काही दिवसांचीच सोबती आहे. तू माझ्याबरोबर येशील ना?''
तिच्या या बोलण्यावर तो थंडपणे "नाही' म्हणतो. ""जीवन खूप सुंदर आहे. तू गेल्यानंतर मी दुसऱ्या मुलीबरोबर लग्न करीन.'' 

त्याच्या या बोलण्यावर ती निराश होते.

आपली निराशा लपवत ती दुसऱ्या मित्राकडे येते. ""तू निष्ठेने माझ्या संपत्तीचे आणि मालमत्तेचे रक्षण केलेस...  यावेळीही तसाच वागशील ना? येशील ना माझ्याबरोबर?''

""मी तुझ्याबरोबर जास्तीत जास्त दफनभूमीपर्यंत येऊ शकेन. त्यापुढे नाही.''

त्याच्या या उत्तराने ती मुलगी पुरती कोलमडून जाते. काय करावे तिला कळत नाही.

... तेवढ्यात एक आवाज येतो, ""मी येईन तुझ्याबरोबर. तू जिथे जाशील, तिथे मी येईन.''

ती मुलगी आवाजाच्या दिशेने बघते, तर समोर तिचा पहिला मित्र असतो.. पोषणाअभावी, दुर्लक्षामुळे खूप अशक्त झालेला.
मुलगी म्हणते, ""मी खरेतर तुझी खूप काळजी घ्यायला हवी होती; पण आता वेळ निघून गेली आहे.''


वास्तवातही, या मुलीप्रमाणे आपलेही चार मित्र असतात.

आपला चौथा मित्र म्हणजे शरीर. त्याचे आपण कितीही कौतुक केले, कितीही चोचले पुरवले, तरीही मरणाच्या वेळी ते आपले साथ सोडते.

आपला तिसरा मित्र म्हणजे, आपले कुटुंबीय आणि मित्रपरिवार. ते आपल्या कितीही जवळचे असले, तरी आपली सोबत ते जास्तीत जास्त दफनभूमीपर्यंतच करू शकतात.

दुसरा मित्र म्हणजे, आपली मालमत्ता, संपत्ती, आपली पत- प्रतिष्ठा. आपल्या मरणानंतर हे सगळे आपोआप दुसऱ्याचे होते.

आणि पहिला मित्र म्हणजे कोण?
आपला पहिला मित्र म्हणजे आपला आत्मा. 
सत्ता, संपत्ती, भौतिक सुखे मिळविण्याच्या नादात त्याच्याकडे नेहमीच दुर्लक्ष होते. खरे तर आत्मा ही अशी एकमेव गोष्ट आहे, जी नेहमी आपल्याबरोबर असते. शेवटपर्यंत आपली साथ करते.

कधीतरी अशीच एक संध्याकाळ असेल....


कधीतरी अशीच एक संध्याकाळ असेल,
ह्रदयात तूझी प्रीत अन ओठावर गीत असेल...
सगळया आठवणी क्षणात डोळयासमोरून जातील,
नकळत मग गालावर या थेंब ओघळतील...

कधीतरी पून्हा तू स्वप्नात येशील,
एकत्र घालवलेले क्षण आठवतील...
तूझ्याशिवाय आता मला जगावं लागेल,
जगतानाही रोज असं मरावं लागेल...

कधीतरी तू ही माझी आठवण काढशील,
प्रीत आठवून मझी कंठ तूझाही दाटेल..
डोळ्यातील अश्रू मूक पणे गिळून टाकशील,
कारण पूसायला तेंव्हा ते मी जवळ नसेन...

कधीतरी असा एक दिवस येइल,
प्रेमापोटी मझ्या तू परत येशील...
पण तेंव्हा या प्रेमाला अर्थ नसेल,
कारण तेंव्हा मी या जगीच नसेन...

कधीतरी मग या मनालाही समजेल,
तूझ्या परतीची अशा तेंव्हा मावळेल...
त्यावेळेस जीवनाला या अर्थ नसेल,
कारण शरीराला तेंव्हा या मनंच नसेल...

कधीतरी तू मला असं वचन देशील?
पूढच्या जन्मी तरी माझा होशील?
मग तू सोडून गेल्याचं दुःख नसेल,
आपण कोणावर तरी प्रेम करू शकलो यातच मग मला समाधान असेल...

गोड गोंडस हळव्या मनाची एक परी कुठेतरी हरवलीय माझी

 
गोड गोंडस हळव्या मनाची
एक परी कुठेतरी हरवलीय माझी
लाउन जिव कशी नकळत जायची
लहान मुलीसारखी अगदी निरागस हसायची
चिडायची कधीकधी, अगदी मुळुमुळु रडायची
काही बोललो मी तर कधी लटके लटकेच रागवायची
माझी गोंडस परी माझ्यावर भरपुर प्रेम करायची

जगायची माझ्यासाठीच अगदी मनामद्ये बसवायची
स्वतःचे अश्रु लपवुन ठेवुन माझे डोळे पुसायची
बोलायची मरेन तुझ्याशिवाय कदाचीत
राहीन रे नेहमीच सोबत तुझ्या
नजरेआड गेलो जरा की अस्वस्थ व्ह्यायची
सापडलो नाही मी की ति वेड्यासारखी व्हायची
ऐकायची गोष्ठी अगदी लहान मुलीसारख्या
माझ्यासाठी रात्र रात्र जागायची
माझी गोंडस परी माझ्यावर भरपुर प्रेम करायची

काय जाणे काय झाले?
माझी परी कुठेतरी हरवली
मला एकटा सोडुन गेली कुठे जाऊन लपली
आता शोधतोय फक्त तिच्या पाऊलखुणा
शब्दही तिचेच होते,भावनाही तिच्याच होत्या
भावनांतुन बनलेल्या कविताही तिच्याच होत्या
मी कुठेच नव्हतो मी होतो "निमीत्तमात्र"...............

कॅप्शन जोडा
आई अगदी आठवड्याच्या गर्भापासून ते नऊ महिन्यापर्यंत
तू माझी काळजी घेतली होतीस.
तुज्या उदरांत असतांना तु माझ्यावर गर्भ संस्कार केलेस
उदरावर हात फिरवत तु " बाळा लवकर ये रे " म्हणत मला गोंजारलेस

आई !!! मी अजून तुझं तान्हं लेकरू आहे गं

अनंत यातना भोगून तू मला जन्म दिलास
सर्व वेदना विसरून तू मला कुशीत घेतलेस
मी डोळे किलकिले करून मोठ्याने रडू लागलो
आणि तू लगेच मला पदराआड घेवून अमृत तुल्य स्तनपान दिलेस

आई !!! मी अजून तुझं तान्हं लेकरू आहे गं

मला नजर लागू नये म्हणून तू
नेहमी मला काळी तीट लावयचीस
मला जरा काही झाले तर तू कासावीस व्हायचीस
माझा प्रत्येक हट्ट तू बाबांशी भांडून पूरवायचीस

आई !!! मी अजून तुझं तान्हं लेकरू आहे गं

मी तुझा हात धरून मी माझे
पहिले दुडू दुडू पाऊल टाकू लागलो
आणि तू आनंदाने टाळ्या वाजवू लागली
मी ही बोबड्या स्वरांत " माझी आई " म्हणत तुला मिठी मारली

आई !!! मी अजून तुझं तान्हं लेकरू आहे गं

आई त्या मिठीत खरंच परमेश्वरी सुख आहे
तुझ्या पोटी जन्म घेणे हा माझा दैवयोग आहे
जगण्याचे धाडस, स्वाभिमान, कणखरपणा
ह्या सर्व गोष्टींचे बाळकडू तू मला दिलेस

आई !!! मी अजून तुझं तान्हं लेकरू आहे गं

बाबांच्या तुटपुंज्या पगारामुळे घरखर्चासाठी
तू पण कष्ट करून लागली
माझा बाळाला काही कमी पडू नये म्हणून
नेहमी उपाशी राहून प्रेमाचा घास भरवू लागली

आई !!! मी अजून तुझं तान्हं लेकरू आहे गं

मला आठवतंय श्यामची आई चित्रपट पाहतांना
तू माझाकडे पाहत अश्रू ढाळत होतीस
आई मी तुझा श्याम नाही होवू शकलो पण
तू माझ्यासाठी श्यामच्या आई पेक्ष्याही श्रेष्ठ होतीस

आई !!! मी अजून तुझं तान्हं लेकरू आहे गं

मला झोप लागावी म्हणून तू नेहमी
तुझ्या हाताची झोळी कळ लागेपर्यंत झुलवायची
मांडीवर थोपटत गोड अंगाई गीत ऐकता
मला किती छान झोप लागायची

आई !!! मी अजून तुझं तान्हं लेकरू आहे गं

आई मी इतका मोठा झालो तरी
तुझ्या कुशीत, मांडीवर डोके ठेवले की
माझे सर्व व्याप, कटकटी विसरतो
केसांवरून फिरणारा तूजा दैवी स्पर्श हवाहवासा वाटतो

आई !!! मी अजून तुझं तान्हं लेकरू आहे गं

आई अजूनही वाटते की तुझ्या मांडीवर डोके ठेवून
तुझ्या गोड गळ्यातील अंगाई गीत ऐकावे
तू मुलायम हाताने थोपटत रहावे
परत एकदा तुझे दुडू दुडू धावणारे बाळ व्हावे

आई !!! मी अजून तुझं तान्हं लेकरू आहे गं

आई तुझे हे बाळ कितीही मोठे झाले तरी
ठेंच लागताच "आई गं ! " हीच किंकाळी ओठांतून निघते
एकाकी, आजारपणात कोणी जवळ नसले तर
मला तूच जवळ असावी असे वाटते

आई !!! मी अजून तुझं तान्हं लेकरू आहे गं

आई आज माझ्याकडे सर्व आहे पैसा , सुख
पण परदेशात तू माझ्या जवळ नाहीस
आई तू मला इतका मोठा केले आहेस
पण तुझ्या प्रेमापासून पोरकेही केले आहेस

आई !!! मी अजून तुझं तान्हं लेकरू आहे गं

कधी एकदा येवून तुला डोळे भरून पाहीन
तुझ्या चरणांना स्पर्श करून कुशीत विसावेन
आई खरं सांगू " हे सर्व सुख जवळ असून मी
तुझ्याविना भिकारी आहे गं ! भिकारी आहे !!

--

मागे वळून पाहता.........

मरण मला पाहून हंसले
मागे वळून मी पाहिले
माझेच मरण मला पाहून हंसले
हंसण्याचे काय कारण पुसता
म्हणाले ते
आलीच वेळ नेण्याची, न विसरता
असते मी सदैव सर्वांच्या मागे
सावली होऊन पहाते कोण कसा वागे
झडप घालते पाहून तो गाफील
जो न समजे जीवन असे मुष्कील
खातो मी सदैव हेल्थी फूड
ठेवीतो माझे मी आनंदी मूड
घेतो मी नियमीत व्यायाम
का मी नये राहू इथे कायम
जनन मरण असे निसर्गाचा नियम
घेशी तू काळजी तुझ्या जीवनाची
वाढवीशी मर्यादा तुझ्या आयुष्याची
जन्मणे हे जरी असे आजचे वृत्त
मरणे हे तरी असे उद्याचे सत्य......

गारवा

गारवा, वार्‍यावर भिरिभर पारवा, नवा नवा
प्रिये नभात ही चांदवा नवा नवा

गवतात गाणे झूलते कधीचे
हिरवे किनारे हिरव्या नदीचे
पाण्यावर सरसर काजवा नवा नवा
प्रिये मनात ही ताजवा नवा नवा

आकाश सारे माळून तारे
आता रुपेरी झालेत वारे
अंगभर थर थर थर नाचवा नवा नवा
प्रिये तुझा जसा गोडवा नवा नवा

भिजलेल्या भूतकाळानी भिजलं... भविष्य...

माझी एक जुनीच कविता...

--------------------------------------

भिजली नदी, भिजले तळे.,
भिजलेल्या आठवणींनी भिजले डोळे...

भिजलं शेत, भिजले मळे.,
भिजलेल्या आठवांचे आज भिजले सोहळे...
..
..
..
भिजली सर, भिजले थेंब.,
भिजलेल्या भावनांमध्ये भिजलं प्रेम...

भिजलं फूल, भिजली पाकळी.,
भिजलेल्या कपाळावर भिजली टिकली...

भिजली लाट, भिजली होडी.,
भिजलेल्या ओठांची भिजली गोडी...

भिजलं पान, भिजली कळी.,
भिजलेल्या गालावर भिजली खळी...

भिजलं गाणं , भिजली शिळ.,
भिजलेल्या हनुवटीवर भिजलं तीळ...

भिजलं रान, भिजले वृक्ष.,
भिजलेल्या ओंजळीत भिजले स्पर्श...

भिजली रात्र, भिजल्या चांदण्या.,
भिजलेल्या नयनांच्या भिजल्या पापण्या...
..
..
..
भिजलं वादळ, भिजले वारे.,
भिजलेल्या विरहात भिजले अंतरे...

भिजलं रक्त, भिजला काटा.,
भिजलेल्या पाऊलांनी भिजल्या पाउलवाटा...

भिजलं आभाळ, भिजले घन.,
भिजलेल्या स्मृतींमध्ये भिजलं मन...

भिजलं जीवन, भिजलं आयुष्य.,
भिजलेल्या भूतकाळानी भिजलं... भविष्य...

जलधारा

जलधारा

जलधारा
रिमझिम ह्या जलधारांवरती
मधुर त्या लहरींवरती
रानपाखरे नाचत होती
विसरुन देह भान रिती..........

गवतावरचे थेंब टपोरे
मातीतुन गंध दरवळे
स्रुष्टीचे चैतन्य आगळे
पानाफ़ुलांवर फ़ुलले...............

क्षणात मेघ बरसुनी जाती
वसुंधरा हिरवी होती
उन-पाउस खेळ खेळ्ती
श्रावणात या सरींवरती............

बघुन ही सारी अवनी
मनास वाटे जावे भिजुनी
जलधारांच्या तालांवरती
तनमन चिंब होउन सजणी

आलाय पाऊस…..भिजून घ्या

आलाय पाऊस…..भिजून घ्या

पाऊस आलाय….भिजून घ्या
पाऊस आलाय….भिजून घ्या
थोडा मातीचा गंध घ्या
थोडा मोराचा छंद घ्या
उरात भरून आनंद घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या

बघा समुद्र उसळतोय
वारा ढगांना घुसळतोय
तुम्हीही त्यांच्यात मिसळून घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या

ऑफ़ीस रोजच गाठत असतं
काम नेहमीच साठत असतं
मनातून भिजावंसं वाटत असतं
मनाची हौस पुरवून घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या

सर्दी पडसे रोजचेच..
त्याला औषध तेच तेच..
प्यायचेच आहेत नंतर काढे ,
आधी अमृत पिऊन घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या

बघा निसर्ग बहरलाय
गारव्याने देहही शहारलाय
मनही थोडं मोहरून घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या.............

एक विनंती आहे.....

एक विनंती आहे..... दुरच जायच असेल तर जवळच येऊ नका,
busy आहे सांगुन टाळायचच असेल तर वेळच देऊ नका..

एक विनंती आहे..... साथ सोडून जायचच असेल तर हाथ पुढे करुच नका ,
मनातून नंतर उतरायचच असेल तर मनात आधी भरूच नका..

एक विनंती आहे...... चौकशी भरे call काळजी वाहू sms यांचा कंटाळाच येणार असेल तर कोणाला
नंबर च देऊ नका, memory full झालिये सांगुन delet च करायचा असेल तर नंबर save च करू नका.

एक विनंती आहे..... मौनव्रत स्वीकारायच असेल तर आधी गोड गोड बोलूच नका ,
secrets share करायचीच नसतील तर मनाच दार उघडूच नका.....

ती एकदा आजीला म्हणाली

ती एकदा आजीला म्हणाली
मुलीनेच का ग नेहमी सासरी जायचं?
आपली माणसं सोडून तीनेच का
परक घर आपलं मानायचं?
तिच्याकडुनच का अपेक्षा
जुनं अस्तित्व विसरायची
तीच्यावरच का जबरदस्ती
नवीन नाव वापरायची?
आजी म्हणाली अगं वेडे
हा तर सृष्टीचा नियम आहे
नदी नाही का जात सागराकडे
आपलं घर सोडून
तो येतो का कधितरी तिच्याकडे
आपली वाट मोडून
तीच पाणी किती गोड तरीही ती
सागराच्या खारट पाण्यात मिसळते
आपलं अस्तित्व सोडून ती
त्याचीच बनुन जाते
एकदा सागरात विलीन झाल्यावर
तीही सागरच तर होते
पण म्हणुन नेहमी तिच्यापुढेच
नतमस्तक होतात लोकं
पापं धुवायला समुद्रात नाही
गंगेतच जातात लोकं............

मेघमल्हाराची सुरू झाली तयारी.........

मेघमल्हाराची सुरू झाली तयारी.........
मेघमल्हाराची सुरू झाली तयारी।
नभी सजली आज एक सभा भारी।

छेडण्या गगनी जलस्वरांची तार।
एक एक ढग आज आतुर फ़ार॥

आणि मग सुरु जाहला तो सोहळा अनुपम।
असंख्य जलथेंबांचे घुंगरू निनादती छमछम॥

नभोमंडपी वीज नर्तकी करी थय थय थैमान।
ढगही धरती एक सुंदर तान,वाऱ्याची बासरी बेभान॥

प्रेक्षक वृक्ष या तालावर डोलती।
या सोहळ्याचे सुंदर गाणे तेही मनात बोलती॥

मग धावुनी आला तो मयुर नर्तक।
वनी ताल धरी, करी सुंदर कथ्थक॥

वसुंधराही या धारानी जाहली आज तृप्त।
प्रत्येकाच्याच मनाची पूर्ण झाली अभिलाषा एक सुप्त॥

शेवटी इंद्रधनुने होई सोहळ्याची सांगता।
काय सांगु ते दृश्य मज न ये वानता॥

ज्याने पाहिला हा सोहळा देखणा।
त्यासी वाटला स्वर्ग ही पुरता उणा॥

मुलीचें जिवन हे असचं असतं

मुलीचें जिवन हे असचं असतं
मुलीचें जिवन हे असचं असतं

मुलीचें जिवन हे असंच असतं

तुझं आनि तिच सारखंच असतं

ज्या कुटुंबात वाढुन मोठे व्हायचं असतं

त्याच कुटुंबाला सोडून जायचं असतं

ज्याने आईचे बोट धरून चालण शिकायचं असतं

त्याच बोटाने कुंकू लावून निघायचं असतं

ज्या वडिलांच्या खांद्यावर खेळून मोठ व्हायचं असतं

त्याच खांद्यावर डोकं ठेवून रडायचं असतं

ज्या बहीण भावाला भांडून रड्वायचं असतं

त्यांनाच सोडून जाताना रडायचं ही असतं

सासूराला जाताजाता उंबरठ्या मधे

बाबासाठी येईल का पाणी डोळ्यामधे...

तू मुलगी आहेस म्हणून का

तू मुलगी आहेस म्हणून का
तू मुलगी आहेस म्हणून का
तुला जन्मायचा हक्क आम्ही नाकारायचा?
तुझ्या येण्याने ह्या जगात
होणार्या आनंदाला आम्ही मुकायचं?

अगं.... आजची तू माझी कन्या
माझ्या उद्याच्या नातवांची आई
काय सांगावं कदाचित उद्याच्या
सुपर हीरोज ची असशील तू आई

राम,कृष्ण, पैगम्बर अन येशु
शिवाजी, गांधीजी की असो इंदिराजी
सगळ्या सगळ्याना एक आई होतीच की
नसतं तिला जन्मू दिलं आम्ही ....
तर इतिहास घडायची शक्यताच नव्हती...

इतिहास आम्हालाही घडवायाचा आहे
आणि घडवायाला तो इतिहास
एक माय प्रसवाविच लागणार आहे....
उद्याच्या स्रुजनाकरिता की...
उद्याच्या जगाला जगवायालाही ....
आम्हाला माय ही लागणारच आहे

म्हणून ...आणि म्हणुनच....
तू मुलगी आहेस म्हणून
तुला जन्मायचा हक्क आम्ही नाकारणार नाही

ह्या जगाला जगवण्या साठी
मायेची पखरण करण्या साठी
नव निर्मितीच्या सृजना साठी
तू ये... तू ये .. तू ये..
बालिका तू आजची
माता अनंत कालाची ....